काल पेपर फुटल्यामुळे आज होणारी टीईटी परीक्षा रद्द झाली. यामुळे परीक्षा यंत्रणांचे धिंडवडे निघाले असून सुमारे साडेसहा लाख गुरुजींना पुन्हा नव्या तारखेला परीक्षेला बसावे लागणार आहे. वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा शासकीय यंत्रणावरील विश्वास ढळू लागला आहे. एवढेच नव्हे तर 3 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या केंद्रप्रमुख भरती परीक्षेवर संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. राज्यात 2410 केंद्रप्रमुखाची पदे भरण्यासाठी 46 हजार 468 अर्जदारांनी अर्ज केले होते तर यातील 38 हजार 558 परीक्षेला बसले होते. 3 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा पार पडली. या परीक्षेचा पेपर देखील तीन लाख रुपयांना काही जणांना देण्यात आला होता अशी शिक्षकांमध्ये चर्चा आहे. मात्र याबाबत राज्यात कुठेच जाहीर वाचता करण्यात आली नाही. या 2410 केंद्रप्रमुखांना चार जून रोजी जिल्हास्तरीय नियुक्त देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात 99 केंद्रप्रमुखांना नियुक्ती मिळाली. बहुतांश लातूर मधील गुरुजी या परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. टीईटी पेपर फुटल्यानंतर आता केंद्रप्रमुख भरती रडारवर आली असून ज्यांचे या परीक्षेतून सिलेक्शन झाले त्यांच्यावर संशयाचे ढग निर्माण झाले आहेत.











