विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून निवडणुकीच्या आखाड्यातील सातही पैैलवानांनी आपली उमेदवारी अद्यापही कायम ठेवली आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असून कोण माघार घेणार आणि निवडणुकीच्या आखाड्यात कोण उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या भाजपाचे राजेंद्र राऊत, शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांच्यासह नागेश अक्कलकोटे , जीवन जानकर, धनंजय डिकोळे, महेश साठे आणि रमेश बारसकर हे षढ्ढू ठोकून ऊभे आहेत. दुपारी तीन नंतर सोलापूरची ही विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार की राज्यभर गाजणार याचे चित्र स्पष्ट होईल.काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेले आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाल्यानंतर सोलापुरातील राजकीय गनिमी काव्याने राज्याचे लक्ष वेधून घेतले.











