
सोलापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यासाठी अवघा तीन दिवसांचा कालावधी असला तरीही सर्वच पक्षात प्रचंड असा राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. भाजपने निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी रघुनाथ कुलकर्णी यांच्या ऐवजी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे दिली होती. पालकमंत्र्यांच्या विविध निर्णयामुळे अगोदरच नाराज झालेले सोलापुरातील दोनही आमदार देशमुख कल्याणशेट्टी यांच्याकडे निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिल्यामुळे अधिक नाराज झाले होते त्यामुळे काल अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अखेर सचिन कल्याण शेट्टी यांनी 24 तासाच्या आतच निवडणूक प्रमुख पदाचा राजीनामा पाठवून दिला.
जिल्हा परिषद निवडणुकीमुळे महापालिका निवडणूक साठी लक्ष देता येणार नाही असे कारण त्यांनी नमूद केले. भाजपमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे आणि आता त्यांच्यासोबत दिलीप माने यांचा गट वजनदार झाला आहे. तर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना वारंवार डावलले जाते असे चित्र दिसते. सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी एकीकडे बाराशे हून अधिक इच्छुक असलेले उमेदवार आणि शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या भाजपमधील उफाळून आलेली गटबाजी या पार्श्वभूमीवर आणखी बऱ्याच घडामोडी घडतील हे नक्की
