पंढरपूर : लोकमाता ही अहिल्यादेवी होळकर यांना प्रजेनं दिलेली पदवी अतिशय सार्थ ठरली आहे. अहिल्यादेवींनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रजेलाच नव्हे तर अखंड हिंदुस्थानला एक राजनैतिक वारसा दिला आहे. प्रजेला आपल्या मुलाप्रमाणे कसं सांभाळायला हवं तसेच प्रजाहितदक्ष कसं असावं तसंच धमपरायनतेसाठी राष्ट्राच्या हितासाठी , पुर्ण राष्ट्रात मंदिरांचं संवर्धन, दानधर्म, धर्मशाळा उभारल्या,धर्मरक्षणही केलं.यासाठी शस्त्रापेक्षा शास्त्राचा कौशल्याने उपयोग केला.
यासाठी आपल्या प्रजेकडून जादाचा कर न घेता त्यांनी आपल्या खाजगीतून जो पैसा मिळे त्यातून त्यांनी हे सर्व पुण्यकर्म केले होते.त्यामुळं त्यांना पुण्यश्लोक, धर्मरक्षक, लोकमाता या पदव्या लोकांनी बहाल केल्या असे प्रतिपादन उदाहरणासह प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण यांनी केले. पुढं त्यांनी सैन्याला कुमक पुरविणे, टपाल व्यवस्था, भिल्ल समाज व गोंड समाजासाठीची ध्येय धोरणे. राज्य व्यवस्था, न्यायव्यवस्था इत्यादिची उदाहरणांसह मांडणी केली.आजच्या सर्व महिलांनी याचा आपल्या जीवनात व कामकाजात आदर्श घ्यावा याचे मार्गदर्शन केले. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्री जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानात बोलताना मार्गदर्शन केले.
श्री पांडुरंग प्रसारक मंडळ संचालित, उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या आभासी पटलाद्वारे समस्त विद्यार्थ्यांना प्रबोधित करताना त्या बोलत होत्या.यावेळी उपस्थित आयोजिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विद्युल्लता पांढरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अहिल्यादेवी यांचे कार्यावर माऊली महाविद्यालय वडाळा येथील मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ .सुवर्णा गुंड यांनी सर्वच स्तरातून व पातळीवर लोकमाता अहिल्यादेवी यांच्या केलेल्या कार्याची जी मांडणी केली.
त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेता. ते कसे आपणास कसे उपयुक्त ठरते यास दुजोरा दिला.
याप्रसंगी उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाह डॉ.मिलिंद परिचारक, जनसंपर्क अधिकारी श्री सुर्यकांत पारखे,प्रा विलास बंडगर,प्रा.सविता दुधभाते, बीएड प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी इत्यादी उपस्थित मान्यवर श्रोते बहुसंख्येने होते. त्यांना प्रेरणादायी अहिल्यादेवींच्या प्रशानकार्याची सखोल , प्रेरणादायी माहिती मिळाली.प्रास्ताविकातुन सुपले तनुजा यांनी भुमिका सांगितली , पाहुण्यांचा परिचय प्रा.जे.एस.बागवान यांनी दिला.सुत्रसंचलन स्मिता जाधव यांनी केले.आभार प्रथमेश शेटे यांनी मानले.