• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, January 18, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी सदाभाऊ खोत थेट आरटीओ कार्यालयात दाखल

by Yes News Marathi
April 12, 2023
in इतर घडामोडी
0
हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी सदाभाऊ खोत थेट आरटीओ कार्यालयात दाखल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली – सौद्यासाठी हळद घेऊन राहुरीहून सांगलीकडे येणारी गाडी आरटीओ अधिकाऱ्यांनी अडवत 30 हजाराचा दंड केला होता. ही घटना समजताच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी थेट आरटीओ कार्यालयात हल्लाबोल आंदोलन करत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाड्या अशा पद्धतीने अडवून शेतकऱ्यांना लुटले जात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

शिवाजी यादव वने असे अडवणूक केलेल्या राहुरीच्या शेतकऱ्यांचे नाव आहे. इस्लामपूरजवळ पेठ नाका येथे वने यांची हळद असलेली गाडी अधिकाऱ्यांनी अडवत 30 हजारांचा दंड करत गाडी सांगलीजवळील सावळी येथील आरटीओ कार्यालयात आणून लावली होती. या कार्यालयावरच हल्लाबोल करत सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करत अधिकारी शेतकऱ्यांनाच लुटत असल्याचा आरोप केला.

यानंतर सावळी येथील आरटीओ कार्यालयामध्ये सदाभाऊ खोत यांनी हल्लाबोल आंदोलन करत आरटीओ कार्यालयात हळदीची पोती ओतून सौदेबाजी आंदोलन केले. हळदीची पोती असलेली गाडी ओव्हरलोड आहे आणि गाडीचा इन्शुरन्स संपलाय म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी 30 हजार इतका दंड केला होता. ही बाब राहुरीचे शेतकरी शिवाजी यादव वने यांनी सदाभाऊ खोत यांच्या कानावर घातली. त्यावेळी संतप्त झालेल्या सदाभाऊ खोत यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आणि संताप व्यक्त केला.

यावेळी राज्य सरकार आणि आरटीओ खात्याच्या कारभारावर सदाभाऊ खोत यांनी संताप व्यक्त करत एकीकडे अवकाळीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्याला दुसरीकडे अशा पद्धतीने लुटले जात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला. राज्य सरकारने एकदाचा ठरवावं शेतकऱ्यांनी जगावं की मरावं? जनतेला लुटणाऱ्या सरकारच्या लाडवलेल्या जावयांना सरकार आवरणार की नाही? अधिकाऱ्यांचा माजुरपणा सरकारने थांबवावा असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला.

पेठ नाका येथे ही गाडी अडवत दंड केल्यानंतर हळद असलेली गाडी आरटीओ अधिकाऱ्यांनी कुपवाड भागातील सावळी येथील आरटीओ कार्यालयामध्ये आणून उभी केली होती. दंड भरा आणि हळदीची पोती असलेली गाडी घेऊन जावा असं शेतकऱ्याला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी थेट सावळीच्या आरटीओ कार्यालयात जात गाडीतील हळदीची पोती कार्यालयाच्या प्रांगणात ओतून हळदीचा लिलाव सुरु केला.

Previous Post

जिल्ह्यातील ३५ जि.प. आणि महापालिका शाळांमध्ये आता उभारणार लायब्ररी अन्‌ संगणक कक्ष

Next Post

अभिमानास्पद ! सोलापूरच्या गंगा कदमची अंध महिलांच्या भारतीय क्रिकेट संघात निवड

Next Post
अभिमानास्पद ! सोलापूरच्या गंगा कदमची अंध महिलांच्या भारतीय क्रिकेट संघात निवड

अभिमानास्पद ! सोलापूरच्या गंगा कदमची अंध महिलांच्या भारतीय क्रिकेट संघात निवड

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In