राज्याच्या बजेटमध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी कोट्यावधी रुपयांच्या घोषणांचा पाऊस पाडला. मात्र या पावसात सोलापूरकर कोरडेच आहेत. रंगपंचमी दोन दिवसांवर आली असताना सोलापूरकरांच्या स्वप्नांचा मात्र बेरंग झाला आहे. विमानसेवेच अवाक्षर नाही.. जिल्ह्यातील धार्मिक टुरिझम वाढविण्यासाठी एक रुपया देखील नाही… उजनीच्या अर्धवट राहिलेल्या सिंचन योजनांसाठी तरतूद नाही… सोलापुराततील उद्योग रोजगार वाढीसाठी कोणताच ठोस निर्णय नाही असा निराशा जनक अर्थसंकल्प आहे. सोलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक होत आहे तरीही शहर जिल्ह्यातील आमदार गप्प कसे बसले हे आश्चर्य. पालकमंत्र्यांनी स्वतःच्या नगर जिल्ह्याकडे कोठ्यावधी रुपये घेतले सोलापूरकरांना मात्र ठेंगा दाखविला. किती दिवस सोलापूरकरांच्या तोंडाला पाने पुसायची ? आता सोलापूरकरांनो..! पुण्यातील कसब्याप्रमाणे तुम्ही देखील ज्यांनी तुम्हाला गृहीत धरले त्यांना इंगा दाखवा आणि सोलापूर बदलण्यासाठी बदल घडवा एवढेच सांगणं.