रत्नागिरी : शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना ईडीने धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.
यानिमित्ताने साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सदानंद कदम यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. खेडमधील कुडोशी येथील त्यांच्या अनिकत फार्म हाऊस या निवासस्थानातून सदानंद कदम यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
दापोली, मुरुड येथील साई रिसॉर्टची मालकी सध्या सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान बंधू आहेत. सदानंद कदम यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्या यांनी अब तेरा क्या होगा अनिल परब, असा सवाल विचारला आहे. त्यामुळे आता अनिल परब यांना अटक होणार का? हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.