सोलापूर – आजादी का अमृत महोत्सवा निमित्त सोलापूर जिल्हा परिषदेने पारदर्शकतेचा आदर्श राज्यासमोर ठेवत 5 कोटी 10 लक्ष रूपयाचा निधी गरीबांचे घरासांठी कुटूबांचे बॅंक खातेवर सिईओ दिलीप स्वामी यांनी एका क्लीक द्वारे जमा केला आहे. जिल्हा परिषदेत सिईओ यांचे निजीकक्षात आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्राणा विभागाची बैठक घेणेत आली. या बैठकीत हा निधी रमाई आवास योजनेते लाभार्थ्यांचे खातेवर सिईओ दिलीप स्वामी यांचे शुभहस्ते जमा करणेत आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सहाय्यक प्रकल्प संचालक यू. जे कुलकर्णी समाज कल्याण अधिकारी सोनवणे, उपस्थित होते.
राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना अनुसूचित जाती व नवबौध्द पात्र लाभार्थ्यांसाठी राबविली जाते. सन 2016-17 व 2019-20 अंतर्गत 14499 घरकुल मंजुर करणेत आले. या पैकी 13069 घरकुले पुर्ण करणेत आली. सन 2021 -22 साठी एकाच दिवशी प्रशासकीय मंजुरी दिलेल्या 2641 पैकी 1700 लाभार्थ्यांचे खातेवर एकाच दिवशी ५ कोटी १० लक्ष रूपये अनुदान वितरीत करणेत आले आहे.
घरकुले वेळेत पुर्ण करा- सिईओ दिलीप स्वामी
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणेत येत आहेत. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत गरीबांना याच कालावधीत घरकुल देणेसाठी प्रशासकीय पातळींवर प्रयत्न केले. १७०० घरकुलांना एकाच वेळी निधी वर्ग करणारी सोलापूर जिल्हा परिषद एकमेव आहे. गरीबांना सुविधा देणेसाठी आमचे सर्व अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत. याचा मला अभिमान आहे. पहिला हप्ता वर्ग केला आहे. वेळेत घरकुल पुर्ण करा. उत्कृष्ठ घरकुल बांधणारे लाभार्थी व कर्मचारी यांचा गौरव करणार असल्याचे सांगितले.
घरकुलांना उज्वला गॅस व नळकनेक्शन – अति. सिईओ धोत्रे
जिल्ह्यातील 1700 घरकुलांसाठीचा पहिला हप्ता 30 हजार रूपये वर्ग करणेत आले आहे. एका घरकुलास 1 लाख 20 हजार रूपये देणेत येतात. चार हप्ते घरकुला साठी देणेत येतात. याचा पहिला हप्ता वर्ग करणेत आला आहे. मनरेगा मधून एका घरकुलास 22320 अनुदान देणेत येत आहे. सिईओ दिलीप स्वामी यांचे पाठपुराव्या मुळे एकत्रीत रित्या अनुदान लाभार्थ्यांना एका क्लिक वर देणेत येत आहे. या सर्व लाभार्थ्यांना उज्वला गॅल, जल जीवन मिशन मधून नळ कनेक्शन देणेत येत आहे.