येस न्युज मराठी नेटवर्क : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित , सौ भू म पुल्ली कन्या प्रशालेच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा. पद्मश्री भोजे , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , वेळापूर , जिल्हा सोलापूर येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ . शशिकांत शिंदे , डॉ प्रभाकर बुधारम , अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन संचलित विज्ञान केंद्राचे समन्वयक बालाजी चौगुले यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सर सी .व्ही. रामन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
. मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले ते भरून काढण्यासाठी कृतीयुक्त शिक्षणात मुलांचा सहभाग वाढावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले . शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना समजण्यासाठी संपूर्ण अभ्यासक्रमातील सर्व प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थिनींनी केली . हवेचा दाब , ध्वनी , ऊर्जा , संवेग अक्षय्यतेचा नियम , गतीविषयक नियम , असे एकूण 70 प्रयोग यावेळी मुलींनी सादर केले. डी एन ए , उत्सर्जन संस्था , ध्वनीलहरी यासारखे अनेक प्रतिकृती तयार करण्यात आले. विज्ञान चित्रे , रांगोळी यांचे रेखाटन करण्यात आले. डायटचे अधिव्याख्याता शशिकांत शिंदे यांनी सी. व्ही. रामन यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतात सांगितले . पद्मश्री भोजे यांनी प्रत्येक घटनेकडे चौकस नजरेने पाहून त्यामागील कारण समजून घेतल्यास वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होईल असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्रा. श्रीनिवास कोंडी यांनी विज्ञानाचा उपयोग मानवी विकासासाठी कशाप्रकारे केला जातो याची उदाहरणे देत विचार व्यक्त केले.
विज्ञान शिक्षक बाळासाहेब गंभीरे , लक्ष्मी कोंडा , रजनी बोलबत्तीन , लता संभारम , अमोल हेरकर , परमेश्वर बाबळसुरे , आशिष मिसाळ , अश्विनी मैसूर , शुभांगी माने , मनीषा कस्तुरे , चारुशीला भालेराव , सचिन मुसळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी उपमुख्याध्यापक युवराज मेटे , पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी परिश्रम घेतले . सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
बाळासाहेब गंभीरे यांनी सूत्रसंचालन केले तर आशिष मिसाळ यांनी आभार मानले .