• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्हा परिषदेच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी सैनिकांसाठी अभियान

by Yes News Marathi
February 17, 2021
in इतर घडामोडी
0
जिल्हा परिषदेच्या वतीने  २५ फेब्रुवारी रोजी सैनिकांसाठी अभियान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : आजी-माजी सैनिकांच्या झेडपी, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील सर्व प्रलंबित प्रश्न राष्ट्रासाठी कुटुंबीयांपासून दूर राहून अव्याहत झटणारे सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडील सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची मोहीम आयोजिली आहे. २५ फेब्रुवारीला ‘एक दिवस सैनिकांसाठी’ अभियानाद्वारे सर्व प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.


आजी माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, शहीद कुटुंबीयांच्या तक्रारी, निवेदन, अर्जाचे निराकरण करणे व अर्ज स्वीकारण्याची विशेष मोहीम येत्या २५ फेब्रुवारीला आयोजिली आहे. सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत पंचायत समितीस्तरावर त्यासंदर्भातील विशेष कामकाज करण्याचे स्वतंत्र परिपत्रक सीईआे स्वामी यांनी प्रसिद्ध केले आहे.

शासकीय योजनांचा लाभ होण्यासाठी मार्गदर्शन
राज्यशासनानेे ग्रामीण भागातील सर्व आजी-माजी सैनिक, शहिदांच्या कुटुंबीयांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. ‘एक दिवस सैनिकांसाठी अभियानामध्ये आजी-माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेला अर्ज, प्रस्ताव, निवेदन, मागणीपत्राची कायदेशीर प्रक्रिया राबवून निकाली काढण्यात येईल. ध्वजनिधी संकलित करून जनजागृती करण्यात येईल. शासकीय योजनांचा लाभ होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्या अभियानामध्ये माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, सर्व अधिकारी यांना शिबिरामध्ये सहभागी करून घ्यावे. त्यांच्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करावी, अडचणी असल्यास योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर त्याबाबतची जनजागृती करून शिबिर आयोजित करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात सात हजार आजी-माजी सैनिक आहेत. २८२० सैनिकांच्या विधवा पत्नी असून, त्यांच्यावर विसंबून २८ हजार ९३२ नागरिक आहेत.


सैन्यात कार्यरत सैनिक आठ-दहा दिवसांची सुटी घेऊन येतात, त्यात त्यांचे काही प्रशासकीय काम प्रलंबित राहते. ते काम पूर्ण करून घेण्यात विविध कार्यालयात भेटींमध्ये सुटी संपते. त्या सैनिकांसह, त्यांच्या कुटुंबीयांंच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. रोजचा दिवस सैनिकांसाठी आहे. पण एकाच दिवशी त्यांचे प्रश्न, निवेदन, तक्रारी सोडवण्यासाठी विशेष शिबिर आहे. त्यामध्ये आजी-माजी सैनिक, कुटुंबीयांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर

Previous Post

सावधान सोलापूरकर हो …’यामुळे’ होऊ शकते तुमच्यावर कारवाई…!

Next Post

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांचा वर्ग

Next Post
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांचा वर्ग

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांचा वर्ग

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group