बिहारच्या निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच महिलांचे विक्रमी असे मतदान झाले होते. बिहारमध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री महिला उद्यमी योजनेत शासनाकडून दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. सुमारे तीन कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले होते यातील सुमारे दोन कोटी 65 लाख महिलांनी मतदान केले .यंदाच्या वर्षी बिहारच्या निवडणुकीमध्ये तब्बल 71% असे विक्रमी मतदान महिलांचे झाले होते. त्यामुळेच एक प्रकारे बिहारमध्ये महिलांनीच पुन्हा एकदा एनडीए सरकार आणले असे म्हणावे लागेल . दुपारी एक च्या आकडेवारीनुसार 283 जागा जागांपैकी 195 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर होते तर 42 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता स्थापन होणार असल्यामुळे भाजपमध्ये जल्लोष सुरू झाला असून आज सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यासाठी येणार आहे

