महाविकास आघाडीत शिवसेना एकदम नगण्य आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांनी राज ठाकरेंसोबत समझोता केला.आता ते युती म्हणून सांगत आहेत. मग ते सर्वांसमक्ष आम्ही एकच आहोत हे सांगायला का घाबरतात, असा खोचक सवाल विचारत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना डिवचले. सोलापुरातील दुधनी नगरपरिषदेसाठी प्रचारार्थ आले असता आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा खोचक सवाल विचारत इतर प्रश्नांना उत्तर दिले.

