मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 4 जूननंतर भाजपमध्ये येणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय. आत्राम यांच्या या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रात खशबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आलपल्लीमध्ये महायुतीच्या सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना आत्राम यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भातील वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. 4 जूननंतर म्हणजे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर वडेट्टीवर भाजपमध्ये येणार असल्याचं आत्राम म्हणाले. 4 जूननंतर विरोधी पक्षनेते आमच्यामध्ये येऊन बसतील. ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील असे आत्राम म्हणाले. गडचिरोली काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये का आलेत? त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून तिकीट दिलं नाही. आदिवासी माणूस गरीबच राहणार आहे लखपती थोडच राहणार आहे असंही आत्राम म्हणाले.