सोलापूर : शेतकरी गेल्या दोन वर्षापासून कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे अगोदरच अडचणीत असताना या वर्षी पुन्हा परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यातच आता विद्युत महामंडळाने बिल भरा असा तगादा लावला आहे. बिल नाही भरले तर वीज कनेक्शन बंद केले जाईल तसेच अशी कारवाई उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून सुरू आहे.
त्यामुळे शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला आहे . या विषयावर मार्ग काढण्यासाठी गाव कट्ट्यावर शेतकऱ्यांमधून अशी चर्चा होत आहे की लोकप्रतिनिधींनी जर विजेचा चा विषय मार्गी लावला नाहीतर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये मतदानच करायचं नाही आपण मतदानावर बहिष्कार घालू एकाही पुढाऱ्याला किंवा लोकप्रतिनिधी ला गावात फिरणे बंद करू अशी चर्चा ऐकायला मिळत आहे .या विषयावर उत्तर सोलापूर तालुक्यातील नेते मंडळी काय काय करणार याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे कारण शेतकऱ्यांनी अनेक पिकांची लागवड तसेच पेरणी करणाऱ्यासाठी हात हुसेने तर कोणी बँक कर्ज तर कोणी सावकाराकडून पाच टक्के नी पैसे काढले आहेत.त्यात जर हातातोंडाशी आलेला घास जर वीज कनेक्शन तोडल्यास पाणी असून देखील पिकांना पाणी मिळणार नाही आणि पिकांचे पूर्णपणे नुकसान होणार आहे.याची भीती आता सर्व शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.