लंडन : अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ म्हणजे १९७१ हे वर्ष. वेस्ट इंडिजला त्यांच्या भूमीवर कसोटी मालिकेत १-० अशी धूळ चारणाऱ्या भारतीय संघाने काही महिन्यांतच इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर हरवण्याची आश्चर्यकारक किमया साधली.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील लॉर्ड्सची पहिली आणि ओल्ड ट्रॅफर्डची दुसरी कसोटी भारताने अनिर्णीत राखली, मग केनिंग्टन ओव्हलच्या तिसऱ्या कसोटीत निर्णायक विजय मिळवत मालिकेवर १-० असे वर्चस्व गाजवले. २४ ऑगस्ट, २०२१ या दिवशी भारताने तो ऐतिहासिक विजय साकारला होता, आज त्या घटनेला ५० वर्षे होत आहेत. भारताच्या विजयानंतर प्रेक्षकांनी मैदानावर अभूतपूर्व जल्लोश साजरा केला.
यशाचे प्रमुख शिल्पकार
दिलीप सरदेसाई, एस. वेंकटराघवन, गुंडप्पा विश्वनाथन, बिशनसिंग बेदी, फारूख इंजिनीयर आणि युवा सुनील गावस्कर हे भारताच्या यशाचे प्रमुख शिल्पकार होते. वाडेकर यांनी भारताकडून सर्वाधिक २०४ एकूण धावा केल्या, तर फिरकी गोलंदाज वेंकटराघवन आणि भागवत चंद्रशेखर यांनी प्रत्येकी १३ बळी मिळवले. या मालिकेच्या एक महिना आधी भारतीय संघ इंग्लंडमध्ये १६ प्रथम श्रेणी सामने खेळला.