सोलापूर – शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास पाथरी येथे घडली होती. या घटनेने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली, घातपात की आत्महत्या याची चर्चा सुरू झाली होती. शेती ही या मयत महिलेच्या नणंदेची असल्याची माहिती समोर आली असून त्याच शेजारी मयत महिलेच्या नवऱ्याचे शेत असून द्राक्षाची बाग आहे.
याप्रकरणी मयत सारिका ढेकळे यांच्या आई लक्ष्मी व्यंकट सुरवसे राहणार नंदगाव,तालुका तुळजापूर यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात 304 ब, 498 अ या कलमाखाली (१) आकाश उर्फ अक्षय उत्तम ढेकळे वय २२ वर्ष २) उत्तम मच्छिंद्र ढेकळे वय ५४ वर्ष ३) अनिता उत्तम ढेकळे, ४) अण्णासाहेब उत्तम ढेकळे वय २५ वर्षे,५)पुजा अण्णासाहेब ढेकळे मुळेगाव-बेलाटी ता.उत्तर सोलापूर सध्या पाथरी ता उत्तर सोलापूर, ६) विलास सुरवसे (७) सोजरबाई विलास सुरवसे रा. नंदगाव ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद, ८) साळुबाई बाळा गुंड ९ ) बाळा गुंड,१०) छकुली ( पुर्ण नाव माहीत नाही) रा. पाथरी ता. उत्तर सोलापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी पती अक्षय ढेकळे, सासरा उत्तम ढेकळे व दिर अण्णासाहेब ढेकळे यांना अटक करण्यात आली असून तिघांना न्यायदंडाधिकारी मिसाळ यांच्यासमोर हजर केले असता 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या बाजूने ऍड प्रशांत नवगिरे, ऍड श्रीपाद देशक तर सरकार तर्फे ऍड बनसोडे काम पाहत आहेत.
लक्ष्मी सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीत मध्ये म्हटले की, मयत सारिका हिचा विवाह 2017 खाली अक्षय यांच्याशी झाला होता तेव्हापासून सारिका हिला सासरचे लोक त्रास देत होते, लग्नात मानपान म्हणून चांगला आहेर केला नाही, सोने दिले नाही म्हणून तिला घालून पाडून बोलणे, टोचून बोलणे, अपमान करणे, तिला नवीन कपडे न देणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठवणे, फोनवर बोलू न देणे, दोन मुली झाल्या म्हणून टोचून बोलणे,या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून सारिका हिने आपल्या दोन मुलींना घेऊन शेततळ्यात जीव दिला.