उत्तर सोलापूर : तिऱ्हे येथे मुसळधार पाऊस आल्याने सीना नदीला महापूर आल्याने तिऱ्हे शिवणी गावचा संपर्क तुटला आहे. तरी शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पृथ्वीराज माने यांनी उत्तरचे तहसीलदार यांच्याकडे केली. यावेळी सोसायटी चेअरमन भास्कर सुरवसे, अजय सोनटक्के, गोवर्धन जगताप, अरविंद जाधव, बबलू सुरवसे, दादासाहेब मल्लव , गणेश शिंदे; रमेश इरसेंटी, सेपन शेक, भिबिशन मल्लव, दीपक मल्लव, विशाल सुरवसे, बलभीम शिंदे , बालाजी गायकवाड, सर्कल सुरे साहेब, कोतवाल शंकर गायकवाड व ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.