पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात मोठे विधान केले आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी विमानतळ उभारण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असे त्यांनी सांगितले. पंढरपुरात सुमारे 4000 कोटी रुपये खर्चून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी असा कॉरिडॉरचा प्रकल्प उभारल्यानंतर शासन विमानतळ उभारण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन कॉरिडॉर पूर्ण करू असा शब्द त्यांनी दिला. दोन-चार लोकांच्या विरोधामुळे कॉरिडॉर चे काम थांबणार नाही असेही ते म्हणाले…










