येस न्युज मराठी नेटवर्क । २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शाळेत येणे देखील पसंत केल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे आता राज्याची परिस्थिती पाहून दि. १ मार्चपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
आगामी शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू करण्याच्या दृष्टीने ठोस नियोजन सुरू आहे. शैक्षणिक वर्ष सुरू करताना शाळा सुरू न झाल्याने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा दोन महिने भरविण्याचे नियोजन केले जात आहे, दि. 1 मार्च ते दि.30 एप्रिलपर्यंत पहिली ते चौथीच्या शाळा भरविल्या जातील व या संदर्भातील अंतिम निर्णय 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत घेतला जाईल, असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.