सोलापूर,दि. ६ : हद्दवाढ झाल्यापासून शाहूनगर या भागात पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत होते तेथे टँकरने पाणीपुरवठा होत होता सदर नगरांमधील नागरी त्यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचेकडे पाठपुरावा केला होता त्याची दखल घेत सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर अत्यावश्यक बाब म्हणून आयुक्तांनी टँकर मुक्त योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. तसेच सदर नगरा मध्ये शासनाचा नगरोस्तान योजने अंतर्गत रस्ते कामासाठी निधी मंजूर झालेला असून त्याचेही काम काही दिवसात करणार आहोत असे नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सदर नगर वासियांना सांगितले. त्यावेळी सदर नगरातील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही हद्दवाढ झाल्यापासून असंख्य समस्यांना तोंड देत होतो परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी मनावर घेऊन सदर कामे तडीस नेली आहे असे मनोगत येथील नागरिकांनी बोलून दाखवले व खऱ्या अर्थाने आम्हाला जनतेच्या मनातील नगरसेवक भेटला याचे आम्हाला समाधान वाटते अश्या प्रतिक्रिया दिल्या त्यावेळी तेथील नगरातील मीनाक्षी जाधव, ईश्वर कोळेकर, रामचंद्र सोलनकर, जलीमीचे, चंदले, विजापूरे, आदीसह ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, वर्ग, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.