सोलापूर- शालेय शिष्यवृत्ती किंवा साहित्य वाटप विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक संधी आहे.आज मिळालेलं उद्या इतरांना द्यायचं ही परतफेडीची भावना विद्यार्थ्यांनी जोपासावे असे मत नगरसेवक डॉ.किरण देशमुख यांनी समाधान धर्म व बालसंस्कार केंद्राच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि शालेय साहित्य वाटप प्रसंगी व्यक्त केले.
समाधान धर्म व बाल संस्कार केंद्राच्या वतीने मंगळवारी सायंकाळी रेवणसिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे शालेय साहित्याचे वाटप आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार आयोजित करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर उद्योजक लक्ष्मीकांत चाटला, महांतेश गुळगी, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र हिंगमिरे, चंद्रकांत मुंडे, दत्तात्रय बडग, मल्लिकार्जुन सोन्ना यांची उपस्थिती होती.
भवानी पेठ परिसरातील इंदिरा वसाहत, भाजी मार्केट, घोंगडे वस्ती, मडडी वस्ती,जोडभावी पेठ येथील ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप समाधान धर्म आणि बालसंस्कार केंद्राच्या वतीने वाटप करण्यात आले.
प्रस्ताविक केंद्राचे संस्थापक सुभाष कलशेट्टी यांनी, सूत्रसंचालन ओंकार मुंडे आणि आभार केदार खोबरे यांनी मानले.











