सोलापूर । कोरोनासारख्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार यंदा कशा स्वरूपाचा अर्थसंकल्प मांडणार याविषयी सर्वांनाच मोठी उत्सुकता होती. आगामी आर्थिक वर्षासाठी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प अतिशय समतोल साधणारा आणि देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारा आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून बनवलेला हा अर्थसंकल्प निश्चितच फायदेशीर ठरेल. इन्फ्रास्ट्रक्चरला बळ देण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीचे नियोजन करण्यात आलं आहे. यामुळे देशाच्या विकासाला मोठी गती मिळेल. सर्वात महत्वाचं म्हणजे जुन्या वाहनांचा वापर बंद व्हावा यासाठी त्यांच्या स्क्रॅपिंगला प्रोत्साहन देण्याची स्वागतार्ह योजना सरकारने मांडली आहे. याचा वाहनउद्योग क्षेत्रावर खूप चांगला परिणाम होईल अशी आशा आहे.
- यतिन शहा, चेअरमन, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड