कोल्हापूर – भाजप हे आरक्षण मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ तोंडासमोर आरक्षणाबाबत ते बोलत असतात. मात्र, भाजपच्या मनात आरक्षणाला विरोध आहे. केंद्रातील भाजप शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
कोल्हापूर उत्तर निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मोत्सवाचे दर्शन घेतले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची सुरुवात केली. अशा या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारक घोषित करावी, अशी भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.