सोलापूर : कधी प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे तर कधी विमानसेवेचा प्रतिसाद किती मिळतो या आडमुठ्या धोरणामुळे आणि लोकप्रतिनिधींचा कोणताच दबाव नसल्यामुळे सोलापूरची विमानसेवा रखडली आहे. छे छे.. आमच्या सिद्धेश्वर कारखान्याची चिमणीच अडथळा ठरत नाही तर एनटीपीसीची चिमणी देखील विमान सेवेला अडथळा ठरत आहे असे बोट कारखान्याने डीजीसीए ला दाखविले आहे. आम्ही चिमणी पाडून घेतो असं ज्या धर्मराज काडादी यांनी शासनाला लिहून दिलं त्याच काढादि यांनी बेकायदेशीर चिमणी असली तरीही विमान उडू शकते याचे संशोधन सुरू केले आहे. सहा महिन्यापूर्वी कारखाना दोन लहान विमाने खरेदी करणार आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं. एवढे बोलून ते थांबले नाहीत तर सिद्धेश्वर कारखान्याच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीने त्यांनी अजेंड्यावर विमान खरेदीचा विषय ठेवला आहे. आता काडादी सोलापूरकरांना उल्लू बनवत आहे की ते खरंच काडादी एअरलाइन्स सुरू करणार आहेत मोठे कोडे सोलापूरकरांना पडले आहे.