सोलापूर :उत्तर सोलापूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीवर तब्बल अडीच वर्षानंतर मुहूर्त लागला असून अध्यक्षपदी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीराम काका साठे यांचे चिरंजीव जितेंद्र साठे यांची नियुक्ती करण्यात आली.या समितीवर राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.या समितीवर हिरजचे सिद्राम सलवदे,बी बी दारफळच्या सुनीता धर्मशाळे,कळमनचे जितेंद्र शिलवंत,श्रीकांत मार्तंडे मार्डी,विजय पुरी कोठाळी,गणपत पाटील कोंडी,वजीर शेख डोंनगांव,धोंडीराम भोसले यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.