• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी जितेंद्र आव्हाडांचा अंगरक्षक वैभव कदमची आत्महत्या

by Yes News Marathi
March 29, 2023
in इतर घडामोडी
0
करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी जितेंद्र आव्हाडांचा अंगरक्षक वैभव कदमची आत्महत्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • ठाणे : करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी वैभव कदम यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. वैभव कदम हे तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाडांचे अंगरक्षक असताना ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना आव्हाड यांच्या बंगल्यात नेऊन बेदम मारहाण केल्या प्रकरणात ते आरोपी होते.
  • भावनिक संदेशाचे स्टेटस : वैभव कदम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर भावनिक संदेशाचे स्टेटस ठेवले. कोणीही अश्रू पाहत नाही, कोणी दुःख पाहत नाही, कोणीही त्रास पाहत नाही, सगळे चुका शोधतात अशा आशयाचे स्टेटस त्यांनी ठेवले होते. यासोबत मला आरोपी म्हणू नका, अशी विनंती ही वैभव कदम यांनी सोशल मीडियावर केली होती. तसेच पोलिसांनी आणि मिडीयाला मी आरोपी नाही, असे देखील त्यांनी नमूद केले.
  • करमुसे प्रकरणात आरोपी : करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणात कदम यांच्यासह सागर मोरे आणि सुरेश जनाटे या पोलिसांनाही अटक झाली होती. जामीन मिळाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. वैभव कदम यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान त्यांचा मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
  • सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित : अनंत करमुसे मारहाण प्रकरणी तपासानंतर वैभव कदम यांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती. दरम्यान अनंत करमुसे यांनी मारहाण प्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या मारहाण प्रकरणात जवाब पुन्हा नोंदविले जाणार होते. मागील अनेक दिवसांपासून विभागीय चौकशीमुळे कदम यांच्यावर मोठा दबाव होता. एकीकडे नोकरीचा मानसिक त्रास आणि न्यायालयात प्रकरण या बाबी त्रासदायक ठरल्यामुळे त्यांनी आत्माहत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
  • सीसीटिव्ही फुटेज ठरले अडचणीचे : अनंत करमुसे यांनी याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती. ते राहत असलेल्या इमारतीच्या लिफ्ट आणि इतर परिसराचे सीसीटिव्ही फुटेज हे अपहरण झाल्याचे पुरावे म्हणून दिले होते. त्यात वैभव कदम हे दिसत होते. यावरून भविष्यात होणाऱ्या अडचणींचा अंदाज कदम यांना आला होता. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते तणावाखाली होते.

Previous Post

आत्मक्लेश यात्रेद्वारे प्रलंबित प्रश्नासाठी सोलापूर ते मुंबई पायी वारी करणारे अर्जुन रामगिर मुख्यमंत्र्याच्या भेटीला

Next Post

राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी दिलासा मिळण्यासाठी ममता बॅनर्जीनी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला

Next Post
राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी दिलासा मिळण्यासाठी ममता बॅनर्जीनी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला

राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी दिलासा मिळण्यासाठी ममता बॅनर्जीनी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group