मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या भाषणाने बार्शी आणि सोलापुरातील जनता खुश झाली. अनेक इच्छुकांनी त्यांच्यापर्यंत विधान परिषदेची आमदारकी मिळावी म्हणून फिल्डिंग लावली होती. काल सायंकाळी भाजपने सुनील कर्जतकर, माधवी नाईक,संजय भेंडे, विवेक कोल्हे,आणि प्रमोद जठार या निष्ठावंतांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. या पदासाठी इच्छुक असलेले सोलापूर शहर जिल्ह्यातील भावी आमदार नाराज झाले. विविध जातीचे समीकरण साधून भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा फार्मूला या माध्यमातून पुढे केला. बच्चू कडू तसेच उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर जाणार का यावर आज शिक्का मूर्त होणार आहे. राजाभाऊ तुम्हाला भाजपमध्ये चांगलं भवितव्य आहे असं कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मात्र त्यांचे देखील नाव कट करण्यात आले. माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक,रणजितसिंह मोहिते पाटील, शहाजी पवार यांची नावे चर्चेत होती. विधान परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून एकाला देखील संधी देण्यात आली नाही त्यामुळे काल खुश दिसणारे आज नाराज झाले. आता पुन्हा या सर्व इच्छुकांचे डोळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून देण्याच्या आमदारकीकडे लागले आहेत.

