येस न्युज मराठी नेटवर्क : वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामपुर गावातील मल्लिकार्जुन महादेव सोनटक्के यांनी विवाह समारंभासाठी ३०० ते ३५० व्यक्ती जमवल्यामुळे ५०,००० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विवाहासाठी २५ व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी दिली असून दोन तासात विवाह सोहळा पार पाडण्याचे आदेश ३१ मेपर्यंत लागू केले आहेत. या आदेशाचा भंग केल्यामुळे वळसंग पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी अतुल भोसले यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड , अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.