राज्यातील 32 साखर कारखान्यांनी मागील हंगामात घेतलेल्या उसाचे 201 कोटी रुपये शेतकऱ्यांना अद्याप दिले नाहीत. यामध्ये मागील गाळपंगामातील एफ आर पी थकवलेल्या 15 साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई करूनही काहीच फरक पडला नाही. ऊस गाळप हंगामात राज्यातील 210 साखर कारखाने सुरू झाले होते .काही कारखाने बंद होऊन सहा तर काहींना पाच महिने झाले आहेत. साखर कारखाने बंद झाल्यापासून शेतकरी ऊस उत्पादक पैशांसाठी तिष्ठत असले तरी साखर कारखानदार याची दखल घेत नाहीत .राज्यातील 32 साखर कारखान्यानी मागील हंगामात आणलेल्या उसाचे 201 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत. जिल्ह्यातील व राज्यातील इतर साखर कारखाने एफआरपी पेक्षा अधिक पैसे चुकते करून पुढच्या हंगामाची तयारी करत असताना मागील वर्षीची एफ आर पी ची रक्कम देऊ न शकलेले 32 व अन्य कारखाने आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर साखर कारखाना 28 कोटी 44 लाख ,श्री संत कुर्मदास माढा 13 कोटी 44 लाख तर अन्य काही अंश रक्कम अशी 42 कोटी 12 लाख रुपये इतकी रक्कम थकली आहे.
इतर कारखान्यांची थकबाकी पुढील प्रमाणे :-
विठ्ठल साई मुरूम कडे 10.77 कोटी ,जुना भाऊसाहेब बिराजदार 6. 82 कोटी, जुना बाणगंगा 5. 33 कोटी , डीडी एन कळंब एक कोटी याप्रमाणे 23 कोटी 11 लाख रुपये थकले आहेत. पतंगराव कदम सांगली 15 .88 कोटी ,रायगड शुगर सांगली 1. 46 कोटी ,ग्रीन पॉवर सातारा 7. 93 कोटी रुपये थकीत आहेत.










