राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीचा अर्थात SIR चा टप्पा पूर्ण झाला असून , राज्यातील 9.78 कोटी मतदारांपैकी 7.71 लाख मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत . मात्र 2 कोटी मतदारांची गणनापत्रे अखेरपर्यंत आलीच नाहीत. त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावे हटवली जाणार आहेत . SIR प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे . मतदार गणना अर्ज सादर करण्यासाठी सोमवार 17 ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदत होती .राज्यात नऊ कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार आहेत त्यापैकी दोन कोटी सात लाख 3268 मतदारांनी एसआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा केले नसल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

अर्ज दाखल न करण्याचे प्रमाण ठाण्यात सर्वाधिक म्हणजे 38% असल्याचा आढळल आहे. मुंबई शहरात ते 37% तर पुणे आणि नागपूर मध्ये हे प्रमाण 31 टक्के आहे. पुणे जिल्ह्यात मतदार गणना अर्ज भरण्यात बारामती ,आंबेगाव आणि जुन्नर हे तीन विधानसभा मतदारसंघ पुढे आहेत. त्या तुलनेत पुणे शहरातल्या कोथरूड खडकवासला आणि हडपसर हे तीन विधानसभा मतदारसंघ मात्र खूपच मागे असल्यास दिसून आल आहे. प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्ट ला प्रसिद्ध होईल या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 ,घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचे नाव समाविष्ट होऊ शकेल.











