राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेच्या अंमलबजावणीला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात 6.22 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट 5 हजार 29 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही मदत हस्तांतरित केली.
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी या कर्जमाफीच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आषाढीला पहिली यादी घोषित केली होती. ही यादी ग्रामपंचायतींना पाठवण्यात आली होती. शेतकऱ्यां फक्त आधार ऑथिंटिकेट करायचं होते. ही प्रोसेस पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.कोणतेही क्लिष्ट अर्ज भरण्याची गरज पडलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे, त्यांच्या कर्जखात्यावर ही रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.










