भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सोलापुरातील दोन उड्डाणपूलांची घोषणा नितीन गडकरी यांनी 2016साली केली होती. याला दहा वर्षे उलटली मात्र भूसंपादन प्रक्रिया न झाल्यामुळे हे दोन्ही उड्डाणपूल अधांतरी आहेत. अक्कलकोट येथील कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी याबाबत खंत देखील व्यक्त केली. शिवाय बजेट वाढवून देत अखेरची संधी देत असल्याचा इशारा दिला. आजवर 68 कोटी रुपयांचे निवाडे घोषित झाले आहेत. खासदारांमार्फत पत्रव्यवहार करा. तीन महिन्यात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी गडकरी यांनी अधिकाऱ्यांवर सोपवली. त्यामुळे जे काम दहा वर्षात झाले नाही ते गडकरी यांच्या सूचनेनंतर तीन महिन्यात करण्याचे चॅलेंज सोलापूरचे अधिकारी आमदार आणि खासदार यांनी स्वीकारावे अन्यथा हे दोन्ही इतिहास जमा होणार आहेत.










