सोलापूर जिल्ह्याने आजवर अनेक पालकमंत्री पाहिले. मात्र विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संपूर्ण शहर आणि जिल्ह्यावर आपले जबरदस्त वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमध्ये मोठे यश मिळवून दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते लाडके मंत्री बनले आहेत. महापालिकेतील पदाधिकारी निवडी असोत किंवा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, सभापती निवडी असोत, प्रशासनातील कोणतेही मोठे निर्णय असोत की बजेट तरतूद करणे असो पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शिवाय पान देखील हलत नाही असा होल्ड त्यांनी निर्माण केला आहे. कधी नव्हे एवढा सस्पेन्स पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये त्यांनी ठेवला. त्यामुळे निवडून आलेले नगरसेवक असोत की झेडपी सदस्य कोणीही मला पद द्या अशी मागणी देखील करत नाही. अगोदरचे पालकमंत्री येतच नव्हते अशी शहर जिल्ह्याची ओरड होती. आणि सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सतत सोलापूर दौऱ्यावर येतात. त्यांच्या डॅशिंगपणामुळे अनेक प्रश्न देखील सुटले आहेत. एवढेच नव्हे काँग्रेस- राष्ट्रवादी अशा इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले राजन पाटील, प्रशांत परिचारक,दीपक साळुंखे आदी बडे नेते गोरे यांच्या कामकाजावर स्तुती सुमने उधळत आहेत. एकूणच सोलापूर शहर जिल्ह्याचे राजकारण असो की प्रशासनातील निर्णय…या प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वर चष्मा ठळकपणे दिसतो हे नक्की.

