जम्मू काश्मीरमधील बर्फवृष्टी व उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला असून तापमापीतला पारा प्रत्येक जिल्ह्य़ात थोड्याफार फरकाने 12 अंशापेक्षाही खाली घसरला आहे. त्याचप्रमाणे सोने – चांदीच्या भावात देखील काल घसरण होऊन दोन्हीही मौल्यवान धातूंच्या भाववाढीला ब्रेक लागला आहे. चांदी तब्बल 12 हजार 500 रुपयांनी घसरली असून ती 2 लाख 40 हजार 500 रुपयांवर आली आहे. तर सोन्याचे दर देखील 2 हजार 300 रुपयांनी कमी होऊन एक लाख 38 हजार 100 वर आले आहे. सलग तीन दिवसाच्या या भाव वाढीला काल ब्रेक लागला.

