सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने झाशीची राणी लक्ष्मीबाई व भारताच्या स्व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या सूचनेनुसार या प्रशिक्षण कार्यशाळेचे मनपा च्या प्राथमिक 22 व माध्यमिक 3 शाळा मधील 550 विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव उपक्रम म्हणून ‘सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण / कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची रुची वाढून त्यांना स्वच्छ व सुंदर अक्षर लिहिण्यास प्रोत्साहन मिळाले.यावेळी प्रशिक्षण / कार्यशाळेचे उद्घाटन भारताच्या प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, महिला व बालकल्याण अधिकारी अजित कुमार खानसोळे, व हस्ताक्षर तज्ज्ञ अभिजीत भडंगे ,मनपा प्रशासकीय कार्यालयीन प्रमुख अल्लाबक्ष शेख, मनपा शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन, यांनी केले.यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हस्ताक्षराचे महत्त्व विद्यार्थांना सांगितले , “आपले हस्ताक्षर आपले व्यक्तिमत्त्व दाखवते. परीक्षेमध्ये आपण काय लिहितो आणि कसे लिहितो यावर आपले गुण अवलंबून असतात. हस्ताक्षर सुंदर असेल, तर वाचणाऱ्यांच्या मनावर ही सकारात्मक परिणाम होतो आपले अक्षर स्वच्छ सुंदर असेल तर वाचणारा उत्तमरीतीने सहज समजू शकतो. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आपल्या हस्ताक्षराकडे लक्ष देऊन ते स्वच्छ व सुंदर काढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सोबतच अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी समारंभात पुष्पगुच्छ, फुलं किंवा शाल असे न देण्याचे आव्हान केले त्याऐवजी गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन अशा शैक्षणिक वस्तू भेट द्याव्यात, जेणेकरून त्याचा सदुपयोग होऊन एक आदर्श निर्माण होईल. या कल्पनेची सुरुवात त्यांनी स्वतः कृतीतून केली, त्यांनी स्वतः ५०० वह्या विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिल्या.सोबतच आजच्या सुंदर हस्ताक्षर उपक्रम सोबतच महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी असे विविध अभिनव उपक्रम यापुढेही राबवत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाची स्वागत महिला व बालकल्याण अधिकारी अजित कुमार खानसोळे यांनी केले. तसेच, महिला बालकल्याण विभागाद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जात असून, असे शालेय उपक्रम भविष्यातही घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.हस्ताक्षर तज्ज्ञ अभिजीत भडंगे यांनी विद्यार्थ्यांना सुंदर व वळणदार अक्षर काढण्यासाठी आपण लक्ष पूर्वक नेहमी सराव करत आपले अक्षर कसे सुंदर वळणदार व स्वच्छ काढू शकतो याचे बारकाईने सोप्या पद्धतीने शिकवले. श्रीनिवास पेद्दिंटी, नितीन मुंढे प्रथमेश सदाफुले , ऋषी लोखंडे, शिक्षिका हाचाटे आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन शिक्षिका खरबस यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक गोपू कांबळे यांनी मानले.





