श्री रामबाग मंदिर तथा श्री रामचंदजी भगवान स्थान, पंढरपूर
श्री क्षेत्र पंढरपूर येथे स्थित श्री मंत्ररत्न प्रतिवादी भयंकर परपरेचा श्रीरामानुज संप्रदायाचा प्रमुख धार्मिक स्थान श्री रामबाग मागील १७० वर्षापासून स्थापित असून येथे श्री १०८१ श्री सीतारामचंद्र भगवानांची नित्योपचार सेवा केली जाते सोलापुरातील व भारतवर्षात सुप्रसिद्ध असणाऱ्या श्रीलक्ष्मीनारायण मंदिराची ही पालक संस्था आहे.
समस्त भागवत अनुयायांच्या सद्भावना व अथक प्रयत्नामुळे, सुमारे ४० वर्षानतर श्री रामबाग संस्थान पुन्हा पूर्णपणे समाजाच्या सेवेसाठी २०१८ पासून प्राप्त झाले आहे.
येथील पूर्वाचार्याच्या तेज व तपशक्तीने मंदिराचे कार्य निरंतर व सुचारूपणे चालावे यासाठी शेकडो एकर जमीन भक्तानी रामबागला दान दिलेली आहे. ४४ वर्षे रिक्त असलेल्या पीठाधीश पदावर श्रीमद् जगद्गुरु डॉ. श्री राघवाचार्य स्वामीजी, अयोध्या याची विराजमानता झाली आहेत.
ट्रस्ट मार्फत श्रीरामबागच्या जमिनीच्या विक्रीचा प्रस्ताव श्री रामबाग मंदिर तथा श्री रामचंद्रजी भगवान संस्थान हि अत्यंत प्राचीन श्री संप्रदायाची गादी आहे. या संस्थेचा प्रमुख उद्देश हा श्री रामानुज सप्रदायी तत्वप्रणालीचा प्रचार व प्रसारार्थ मठ, ज्याचे कार्य पूजा व अर्चा उत्सवादि पाचरात्र परपरेप्रमाणे चालविणे हा आहे
तत्कालीन भक्तानी श्रद्धेने व मंदिराचा कारभार निरंतर चालावा या उद्देशाने ज्या जमिनी दिलेल्या आहेत, त्या जमिनी विद्यमान संचालकानी आधुनिकीकरणच्या नावाखाली मंदिर डेव्हलप करणे या कारणाने करोडो रुपयांच्या जमिनी विक्रीस काढल्या आहे. या जमिनीतून अनेक प्रकारचे उत्पन्न उदा. सुबाभूळ शेती, बाबू शेती, सरकारी सोलर इत्यादी अनेक मार्गाने करोडौ चे उत्पन्न घेणे शक्य आहे जरुरी आहे मानसिकतेची व निष्ठावत कार्यकर्त्यांची. तसेच वास्तविक पाहता या संप्रदायाचे अनुयायी है सधन व दानशूर आहेत धर्मासाठी लाखो रुपये देण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती असताना अशा प्राचीन देवस्थानच्या जागा विक्रीस काढणे व सर्वात कि एवढ्या मोठ्या जमिनीची व करोडो रुपयांच्या ट्रस्टच्या जमिन विक्रीचा लिलाव व त्यास परवानगी कशी मिळवण्यास आली हे मोठे गौडबंगाल आहे.
मंदिर व ट्रस्ट हे कोणाच्या खाजगी मालकीचे आहे काय? हि प्रभू श्रीरामचंद्रांची संपत्ती आहे
समाजाची भूमिका
“श्री रामबाग” ही आमच्या श्रद्धा, आस्था व सनातन संस्कृतीची अमूल्य आध्यात्मिक धरोहर आहे.
ही भूदानातून मिळालेली भगवान श्रीरामांची संपत्ती आहे विक्रीसाठी नव्हे.
ट्रस्ट व्यवस्थापनात पारदर्शकता, मंदिराचा संरक्षण आणि श्रीरामबागचे पुनर्वैभव साध्य करण्याचे समाधान हाच समाजाचा उद्देश आहे.

