एक हजार शेतकऱ्यांना जेवण वाटप करण्यात आले व पूरग्रस्त महिलांना व लोकांना २५० किट वाटप करण्यात आले.

यंदाच्या पावसाळयात सीना नदीत आलेल्या इतर पाणी साठयामुळे नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे अतिरिक्त पाणी सोडण्यात आलेल्या उत्तर सोलापूरातील ,तिन्हे र्भांगे वस्ती,गायकवाड वस्ती,पाथरी गाव, माने वस्ती, पुजारी वस्ती, मागास वस्तीतील लोकांना
आदीं गावक-यांना आस्था रोटी बँकेतर्फे ब्लँकेट ,साबण,पेस्ट,टाॕवेल,स्त्रियांना नविन साडया, झेंडू बाम, खोबरे तेल, ब्रश, कंगवा,
हयाव्यतिरिक्त पिण्यास बिसलेरी पाणी बाॕटल्स व तात्काळ खान्यासाठी भाकरी,चपात्या ,पिठल ,राईस पुलाव, बिस्किट असा मेनू देऊन माणुसकीच आणखी एक उदाहरण समाजापुढ ठेवल.आस्थेचे काम च आहे.जिथ कमी तिथ आम्ही इसे वाक्य उदगारणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय छंचुरे व त्यांच्या कार्यांनी रविवार आठवडयाचा एक निवांत दिवस पण इथ विश्रांती न घेता पुरग्रस्तांना मदतीसाठी पुढे आले.

फक्त सोशल मिडिया वर पोस्ट बघून हळहळ करण्यापेक्षा एक एक व्यक्ती ही खारीच्या वाटयाप्रमाणे मदत केल्यास किमान सरकारला डोक काढता येईल
सरकार कुणाचेही असो मदत वेळेवर येणे अत्यंत गरजेचे आहे.
कारण अक्षरशः पुरामूळे पाण्यात वसलेली गाव एक एक पाण्याच्या घोटासाठी चातकाप्रमाणे मदतीआस लावून बसलेल्या माता भगिनी
तर नातेवाईकांना आपण सुखरुप आहोत जिवंत आहोत काळजी करु नका असा एकदा काॕल किंवा whatsapp करायला ही नेटवर्क नाही का मोबाईलमध्ये चार्ज नाही लाईट बंद घरात असलेले कपडे लत्ते धान्य भाजीपाला पाण्यात समाधी झाल्यामुळे फक्त जीव वाचण्यात घरावर तुळशीपत्र ठेवून जीव मुठीत घेऊन जगण्याच्या आशेवर मदतीसाठी आस लावलेल्या अजूनही मदत जिथे पोहचली नाही किंबहुना ती पुरेशी नव्हती अश्या वस्त्यांमध्ये आस्था रोटी बँकेतर्फे सहभागातून
मदत करण्यात आली.
ज्यात प्रामुख्याने विजय छंचुरे,इंदुबाई छंचुरे ,पुष्कर पुकाळे ,रविंद्र गोयल, विनोद भोसले निलिमा हिरेमठ ,कांचन हिरेमठ ,छाया गंगणे ,अनिता तालीकोटी ,अविनाश मार्चला , स्नेहा मेहता, मेहता , विद्या सिंघम, भारत जाधव आदींनी पुढाकार घेतला
प्रसंगी आश्या अनेकोनेक संस्थांनी पुढे येऊन मदत केले असे आव्हान आस्थाच्या वतीने करण्यात आली

