सोलापूर — स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून “स्वच्छता ही सेवा – २०२५” या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरात आज सकाळी भव्य श्रमदान मोहीम राबविण्यात आली. शहरातील प्रमुख ८ ठिकाणी एकाच वेळी सकाळी ८ वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली.





१)छत्रपती संभाजी महाराज चौक ते अभिमानश्री अपार्टमेंट, २)कै. तात्या कोटे प्रवेशद्वार ते लक्ष्मी चौक (विडी घरकुल),३)शांती चौक पाणी टाकी ते अशोक चौक मस्तानी हॉटेल (डावी बाजू) ४)७० फूट मार्केट ते आकाशवाणी केंद्र ५)धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसर ते जगदीश मंगल कार्यालय ६)रामलिंग नगर ते निर्मिती विहार ७) बलिदान चौक ते बुधले गल्ली व अलकुंटे मैदान या ठिकाणी स्वच्छता मोहीम पार पडली.
मुख्य कार्यक्रमात मान्यवरांचा सहभाग
धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसर येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वछता सदर्भात शपथ घेण्यात आली. आमदार सुभाष देशमुख व महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे प्रमुख उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विना पवार,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मुख्यलेखा परीक्षक रुपाली कोळी, सह. आयुक्त शशिकांत भोसले,नगर अभियंता सारीक आकूलवार, आरोग्य अधिकारी राखी माने, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार,केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी अंबादास यादव आणि जे एम हन्नुरे यांच्या सह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. नागरिकांनीही झाडू हाती घेऊन परिसर स्वच्छतेसाठी उत्साहाने योगदान दिले.या उपक्रमाद्वारे शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, तलाव परिसर, बाजारपेठा व मैदाने स्वच्छ करण्यात आली. ठिकठिकाणी पडलेला कचरा, प्लास्टिक व घाण साफ करून परिसर स्वच्छ करण्यात आला. यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती झाली असून शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचविण्यात आला.”माझं सोलापूर – स्वच्छ सोलापूर, माझं सोलापूर – सुंदर सोलापूर” हा संदेश देत उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी प्लास्टिकमुक्त, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक सोलापूर घडविण्याचा संकल्प केला.





शहर अधिक स्वच्छ, सुंदर व स्मार्ट बनविण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यावेळी सांगितले. तर, नागरिकांचा सहभाग हीच खरी ताकद असल्याचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी नमूद केले.तसेच या मोहिमे मध्ये शहरातील शाळा,माहाविद्यालय विध्यार्थी, सामाजिक संघटना यांनी शामिल व्हावे.
या भव्य श्रमदान मोहिमेमुळे स्वच्छतेबाबत एक चळवळ उभी राहिली असून पुढील काळात शहरातील प्रत्येक नागरिक स्वच्छतेसाठी अधिक जबाबदारीने पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

