• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची एकत्र बैठक आणि चर्चा !

by Yes News Marathi
April 12, 2023
in मुख्य बातमी
0
अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची एकत्र बैठक आणि चर्चा !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह इथे ही भेट झाली. अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर ही भेट झाली. साधारण 50 मिनिटं ही बैठक झाली. बैठक संपवून अजित पवार तीनच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडले. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार बैठकीनंतर मागच्या गेटने निघाले. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्या भेटीची सध्या जोरदार चर्चा आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळावी याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसंच एका आठवड्यात सर्व पंचनामे केले जातील आणि लवकरच मोबदला दिला जाईल असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे एका विशेष मदतीच्या पॅकेजची घोषणा सरकार करणार असल्याचे बैठकीत ठरल्याची माहिती मिळत आहे.

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दुपारी दोन वाजता ते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली. यावेळी अजित पवार यांनी विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिल्याचं समजतं.

अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. केळी, द्राक्ष, आंबा संत्रा या फळबागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. तर हरभरा, गहू, ज्वारी भाजपाला पिकांचेही मोठे नुकसान यामध्ये झाले होते. या नुकसानीमुळं बळीराजा पुरता कोलमडला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत मदत जाहीर करावी, अशी अजित पवार यांनी केली आपल्या निवेदनात केली आहे.

Previous Post

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचे लेटेस्ट फोटोशूट!

Next Post

जिल्ह्यातील ३५ जि.प. आणि महापालिका शाळांमध्ये आता उभारणार लायब्ररी अन्‌ संगणक कक्ष

Next Post
जिल्ह्यातील ३५ जि.प. आणि महापालिका शाळांमध्ये आता उभारणार लायब्ररी अन्‌ संगणक कक्ष

जिल्ह्यातील ३५ जि.प. आणि महापालिका शाळांमध्ये आता उभारणार लायब्ररी अन्‌ संगणक कक्ष

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group