मुंबई : ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयाला उद्याच्या कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब करणार आहोत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर हे बाळासाहेबांचे स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, सरकार अल्पमतात असताना ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णय घेतला. सरकार अल्पमतात असताना कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय बेकायदेशीर असतात. आम्ही उद्या सकाळी कॅबिनेट घेऊन संभाजीनगर नामांतराच्या निर्णयाला शिक्कामोर्तब करणार आहोत.
शिवसेनेला आणि शिवसैनिकांनी वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला
शिवसेनेला आणि शिवसैनिकांनी वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ही भूमिका सगळ्यांना न्याय देणारी आहे. पुण्याच्या रस्त्यावर पंढरपूरला जाताना माझं स्वागत करत होते. लोकांच्या भावना बघितल्या त्यांचा आशीर्वाद घेतला. माझा हे सगळं करण्यामागे काहीच स्वार्थ नव्हता. एक, दोन नाही तर पन्नास लोक माझ्यामागे आहे. मला म्हणे मुख्यमंत्री करतो, पण मी मुख्यमंत्री पदासाठी आलोच नाही. आपला पक्ष मोठं करण्यासाठी आपल्या माणसाचा ऐकलं पाहिजे म्हणून मी आलो आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.