• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, August 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा : उद्धव ठाकरे

by Yes News Marathi
July 4, 2022
in मुख्य बातमी
0
हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा : उद्धव ठाकरे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केलं आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आज त्यांनी शिवसेना भवनमध्ये राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे या घटनेचा अपमान असल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. ते पुढे म्हणाले की, आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर चुकत असेल, तर आपल्याला जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात. विधिमंडळामध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. विधानसभेत सुरु असलेल्या घडामोडींवर त्यांनी घटनातज्ज्ञांना विनंती केली की जे काही सुरू आहे याबाबत भूमिका स्पष्ट करावी. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या असे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे
लढायचे असेल तर सोबत राहा
भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव
असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल ,
तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल ,
घटना तज्ज्ञांना विनंती आहे आपण घटनातज्ञ आहात ,
सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या
विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान

Previous Post

लढून शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही; मुख्यमंत्री शिंदे विधानसभेत आक्रमक

Next Post

फडणवीस आणि आम्ही मध्यरात्री भेटायचो? : एकनाथ शिंदे

Next Post
फडणवीस आणि आम्ही मध्यरात्री भेटायचो? : एकनाथ शिंदे

फडणवीस आणि आम्ही मध्यरात्री भेटायचो? : एकनाथ शिंदे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group