• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 31, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रामनवमीला नॅानव्हेज खाऊ नये ही भूमिका योग्य – रामदास आठवले

by Yes News Marathi
April 11, 2022
in मुख्य बातमी
0
रामनवमीला नॅानव्हेज खाऊ नये ही भूमिका योग्य – रामदास आठवले
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : राजधानी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. रामनवमी दिवशी मांसाहार करु नये, अशी भूमिका मांडत उजव्या विचारांच्या संघटनांनी डाव्या संघटनांवर जबरदस्ती केली, असा आरोप केला गेला आहे. यानिमित्ताने सणादिवशी मांसाहाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अशातच मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रामनवमीला नॅानव्हेज खाऊ नये ही भूमिका योग्य असल्याचं मत रामदास आठवले यांनी मांडलं आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कावेरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये रविवारी हिंसक संघर्ष झाला, ज्यात एबीव्हीपी आणि डाव्या संघटनांचे १० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी रविवारी कावेरी वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी रामनवमी पूजा आणि हवनाचे आयोजन केले होते. तर दुसरीकडे होस्टेल परिसरात इफ्तार पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीसाठी मांसाहारही ठेवण्यात आला होता. यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. रामनवमीची पूजा सुरु असल्याने आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने हॉस्टेल मेसच्या मेनूमध्ये मांसाहाराचा समावेश करु नये, अशी भूमिका एबीव्हीपीने मांडली. यावरुनच पुढे दोन गटांत राडा झाला.

जेएनयूमधील घटनेवर समाजमाध्यमातून विविध प्रतिक्रिया उमटत असताना मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलंय. रामनवमीला नॅानव्हेज खाऊ नये ही भूमिका योग्य असल्याचं मत रामदास आठवले यांनी मांडलं आहे. सगळ्यांच्या भावनांचा विचार करुन हे मत योग्य असल्याचं आठवले म्हणाले आहेत. जेएनयूमध्ये झालेल्या वादावर रामदास आठवले यांना पुण्यात पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. त्यावेळी आठवले बोलत होते.

Previous Post

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा इशारा ४ दिवसांआधीच

Next Post

भोंग्यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या वसंत मोरेंचा अखेर ‘जय श्रीराम’चा नारा

Next Post
भोंग्यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या वसंत मोरेंचा अखेर ‘जय श्रीराम’चा नारा

भोंग्यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या वसंत मोरेंचा अखेर 'जय श्रीराम'चा नारा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group