येस न्युज नेटवर्क : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवड्यास सुरुवात झाली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना ६०० कोटींची तातडीची मदत राज्य सरकार करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत केली. धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याने त्यांना बोनस देण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मात्र बोनसचा फायदा दलालांना होऊ नये म्हणून जमिनीचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन मदत करणार असल्याची अजित पवार यांनी सांगितले.

