सोलापूर: आज काही वृत्तपत्रांत सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याची बेकायदा को-जनरेशन चिमणी पाडकामासाठी पोलीस बंदोबस्त देण्यासाठी नकार दिल्याची बातमी काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे सीद्धेश्वर कारखान्याचा सध्या गाळप हंगाम चालू आहे त्यामुळे चिमणी पाड काम करावयास गेल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून गाळप संपेपर्यंत पाड कामासाठी पोलिस बंदोबस्त देता येणार नाही असे सोलापूरच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले असे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितलेले धादांत खोटे आहे. सोलापूर विचार मंचच्या डॉ. संदीप आडके यांच्याशी बोलताना पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी आयुक्त जेव्हा मला पोलिस बंदोबस्त मागतील त्याच्या दुसऱ्या क्षणाला मी दुप्पट पोलीस बंदोबस्त देईन असे सांगितले आहे.सत्य परिस्थितीत सुद्धा त्यांनी सुमारे ९०० पोलिस बंदोबस्तासाठी राखीव ठेवलेले आहेत.२४ डिसेंबरला उच्च न्यायालयाचे चिमणीचे अभय संपले आहे, त्यामुळे सोमपा आयुक्त पी. शिवशंकर हे खोटे बोलून चिमणीस स्वतः अभय देत आहेत व हीच गोष्ट त्यांनी व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गेले दीड वर्षभर केलेली आहे या दोघांनीही आपल्या पदाचा गैरवापर करून चिमणी पाडकाम या न त्या कारणाने रोखुन धरलेले आहे खरेतर १६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाने यांना ‘सिद्धेश्वर’ची अवैध को जनरेशन चिमणी तात्काळ पाडून टाकण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा हे दोघेही चालढकल करीत आहेत, त्याच मुळे सोलापूर विचार मंचच्या संजय थोबडे यांनी या दोघांचीही अँटीकरप्शन ब्युरोकडे तक्रार केली आहे.
आजच चिमणी पाडकाम रोखण्या मध्ये दिनांक ८डिसेंबर २०२१ रोजी माननीय शरद पवार यांनी नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना एक पत्र लिहून धर्मराज काडादी यांच्या म्हणण्याप्रमाणे चिमणी पडली तर कारखान्याचे फार मोठे नुकसान होईल व या विमानतळावर १५आणि ३३ नंबरचे दोन रनवे आहेत त्यामुळे दुसऱ्या रनवेचा वापर करून विमानतळ चालू ठेवता येते व महाराष्ट्र शासनाच्या ठरावा प्रमाणे होटगी रोड विमानतळ आहे बोरामणीला हलवण्यात येणार आहे असे लिहिलेले पत्र सोशल मीडियात व्हायरल झालेले आहे. त्यामुळे चिमणीपाड रोखण्यामध्ये खुद्द शरद पवार हेच प्रशासनावर दबाव टाकून सोलापूरचे वाटोळं करीत आहेत हे आता सिद्ध झालेले आहे.
या चिमणी मुळे सोलापूरचे होडगी रोड वरचे सुसज्ज विमानतळ बंद पडलेले आहे. पण जर आता ही चिमणी यांनी पाडली नाही तर मात्र सोलापुरात खरंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आत्तापर्यंत सोलापूर विचार मंचच्या सर्व सदस्यांनी हे प्रकरण अत्यंत संयमाने हाताळले आहे व पोलीस प्रशासनाने नेहमीच तत्परतेने या प्रकरणात लक्ष देऊन मदत केलेली आहे, परंतु आयुक्तांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी आता चिमणी पाडली नाही तर नक्कीच लोक रस्त्यावर उतरतील व मोठे आंदोलन करतील यात काहीही शंका नाही.