• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, July 31, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

‘ऑलिम्पिकचा मोठा प्रभाव, घराघरात खेळावर चर्चा ‘

by Yes News Marathi
August 29, 2021
in इतर घडामोडी
0
‘ऑलिम्पिकचा मोठा प्रभाव, घराघरात खेळावर चर्चा ‘
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हॉकीचा विशेष उल्लेख करत मेजर ध्यानचंद यांचे स्मरण केले. आणि सब खेले, सब खिले- ही नवीन घोषणा दिली. यासोबतच प्रतिभावान लोक हे आजचे विश्वकर्मा आहेत, असं ते कुशल नागरिकांबद्दल म्हणाले. यावेळी ऑलिम्पिकने मोठा प्रभाव निर्माण केला आहे आणि प्रत्येक कुटुंबात खेळावर चर्चा होतेय, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आज मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. आज ध्यानचंद यांचा आत्मा आनंदी असेल. जगभरात भारताचा डंका वाजवण्याचे काम ध्यानचंद यांनी हॉकीतून केले होते. भारताच्या मुला-मुलींनी ४ दशकानंतर हॉकीला नवसंजीवनी दिली. आहे. कितीही पदक जिंकली तरी सर्वाधिक आनंद हा हॉकीत पदक जिंकल्यानेच होतो. यावेळी भारताने पदक जिंकले आहे. ध्यानचंद यांनी खेळासाठी आपले जीवन वाहिले. आज त्यांच्या आत्मा प्रसन्न असेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशातील आजच्या तरुण पिढीला काहीतरी वेगळ करायचे आहे. त्याला रुळलेल्या रस्त्यांवरून जायचे नाही. नव्या मार्गावर जाण्याची त्याची इच्छा आहे. त्याचे ध्येय आणि मार्ग नवीन आहेत. काही काळापूर्वीच भारताने अंतराळ क्षेत्र खुले केले. तरुणांनी ही संधी मिळवली. तरुण पुढे आले. आगामी काळात असे उपग्रह असतील जे महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तरुणांनी बनवलेले असतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
स्टार्टअप संस्कृती आता छोट्या शहरांमध्ये विस्तारत आहे. तरुणांना जोखीम घ्यायची आहे. भारतीय खेळण्यांना जगात स्थान उच्च स्थान मिळवून देण्याचा निश्चिय त्यांनी केला आहे. आज आपल्या देशातील तरुण त्याकडे लक्ष देत आहेत. यामुळे मन आनंदी आणि आत्मविश्वास वाढतोय. चालतंय ना… असा स्वभाव झाला होता. पण आता तरुण सर्वोत्तम बनवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे, त्याला सर्वोत्तम काम करायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ऑलिम्पिकचा देशावर मोठा प्रभाव पडला. आता पॅरालिम्पिक सुरू आहे. जे घडले ते आत्मविश्वास जागृत करण्यासाठी पुरेसे आहे. प्रत्येक कुटुंबात खेळांची चर्चा सुरू झाली आहे. हे थांबायला नको. कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय जीवनात कायमस्वरूपी स्थान बनवावे लागेल आणि सतत नवी उर्जा निर्माण करावी लागेल. गावांमधील आणि शहरांची मैदाने भरलेली पाहिजेत. सर्वांच्या प्रयत्नांनी भारत क्रीडा क्षेत्रात नवी उंची गाठेल. मेजर ध्यानचंद जींनी दाखवलेल्या मार्गावर पुढे जाण्याची आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले .

Previous Post

शिवसेना नेत्याच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांचा फज्जा

Next Post

५ सप्टेंबरपासून सोलापूर शहर राष्ट्रवादीची प्रभाग संवाद यात्रा…

Next Post
५ सप्टेंबरपासून सोलापूर शहर राष्ट्रवादीची प्रभाग संवाद यात्रा…

५ सप्टेंबरपासून सोलापूर शहर राष्ट्रवादीची प्रभाग संवाद यात्रा…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group