• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, July 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

५० कोटी भारतीयांना मिळाली करोनाची लस

by Yes News Marathi
August 7, 2021
in इतर घडामोडी
0
५० कोटी भारतीयांना मिळाली करोनाची लस
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात केंद्र सरकारकडून मोफत आणि व्यापक लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आल्यापासून देशाक केंद्र सरकारकडूनच सर्व राज्यांमध्ये लसींचा पुरवठा केला जात आहे. या वर्षाखेरीस पर्यंत अर्थात डिसेंबर २०२१ पर्यंत देशातील सर्वांना लस देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने जाहीर देखील केले होते . त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत देशात ५० लाख भारतीयांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी यासंदर्भात ट्वीट देखील केले आहे. तसेच, सर्वांसाठी मोफत लस या कार्यक्रमाचे कौतुक देखील केले आहे.


५० कोटी लसींचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करणारे ट्वीट केले आहे. “करोनाविरोधातल्या भारताच्या लढ्याला एक प्रबळ प्रेरणा मिळाली आहे. आपल्या लसीकरण मोहिमेनं ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. मला आशा आहे की यात उत्तरोत्तर भर पडत जाईल आणि सर्वांना मोफत लसीकरण मोहिमेमध्ये आपल्या नागरिकांना लस दिली जाईल”, असं ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी दिवसभरात भारतात ४३ लाख २९ हजार करोनाचे डोस देण्यात आले आहेत. “भारतानं कोविड १९ साठीच्या लसीकरणात मोठी झेप घेतली आहे. आजपर्यंत भारताने ५० कोटी लसी देण्याचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे”, असं ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केले आहे. यामध्ये १७ कोटी २३ लाख २० हजार ३९४ नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे.आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात १० कोटी नागरिकांना लस देण्यासाठी ८५ दिवस लागले. त्यानंतर पुढचे १० कोटी डोस देण्यासाठी ४५ दिवस लागले. ३० कोटींचा टप्पा पार करण्यासाठी भारताला अजून २९ दिवस लागले. त्यापुढचे १० कोटी डोस देण्यासाठी २४ दिवस तर ५० कोटींचा टप्पा पार करण्यासाठी त्यापुढे अवघे २० दिवस लागले.
मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकी १ कोटींहून जास्त नागरिकांना लस दिली आहे. तर, आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरयाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकी १० लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
ही अभिमानाची बाब!
दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि नाशिकमधील भाजपाच्या खासदार भारती पवार यांनी या कामगिरीचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. “भारतात लसीकरणाने ५० कोटींचा टप्पा ओलांडला ही अभिमानाची बाब आहे. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहोचावी, यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे”, असे भारती पवार म्हणाल्या आहेत.

Previous Post

सोलापूर विद्यापीठाने तयार केला महापालिकेसाठी पर्यावरण आराखडा

Next Post

फडणवीस, शेलार यांची गृहमंत्री अमित शहांशी स्वतंत्र चर्चा

Next Post
फडणवीस, शेलार यांची गृहमंत्री अमित शहांशी स्वतंत्र चर्चा

फडणवीस, शेलार यांची गृहमंत्री अमित शहांशी स्वतंत्र चर्चा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group