सोलापूर : (समाधान रोकडे) उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी या गावातील शेतकर्यांच्या जमिनी गेली एक दशक झाले कॅनॉल साठी आधिग्रहन केल्या गेल्या आहेत, त्या जमिनीचा मोबदला शेतकर्यांना आजतागाईत मिळालेला नाही.या साठी उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावातील शेतकर्यांच्या सोबत बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशिद यांनी कॅनॉलचे मुख्य अधिकारी घुगे साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली व तातडीने त्या शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याचे सांगितले असता त्या संबंधित अधिकारीशब्द घुगे साहेबांनी आठ दिवसात हा विषय मार्गी लावू असण्याचे आश्वासन दिले.या भेटीत नंतर शेतकर्यांच्या प्रश्नांला गती मिळाली असून येत्या आठवड्यात शेतकर्यांच्या जमिनीचा मोबदला मिळणार असून शेतकर्यांच्या चेहर्यावर न्याय मिळाल्याची गुणगुण शेतकऱ्यामधून मधून निघत असून चेहऱ्यावर आनंद झाल्याचे दिसून आले.या बैठकिस यावेळी उपस्थित नंदकुमार गरड, लकी शिंदे, गोपाळ गरड, विशाल शिंदे, जोतिराम पाटील, अंगद भोसले याच बरोबर अनेक पडसाळी गावातील शेतकरी उपस्थित होते.