मुंबई : स्वबळाच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी काहीशी सबुरीची भूमिका घेतली. काँग्रेस पक्ष हा पाच वर्षे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असेल. तसा शब्द खुद्द सोनिया गांधी यांनी दिला आहे, असे पटोले यांनी रविवारी सांगितले .कोथरूड येथे नगरसेवक चंद्रकांत कदम यांनी सुरू केलेल्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन नाना पटोलेंच्या हस्ते आज झाले . त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पटोले यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सावध मत व्यक्त केले . ‘उ्द्धव ठाकरे हे काल मुख्यमंत्री नव्हे तर पक्षप्रमुख म्हणून बोलले. स्वबळाची भाषा शिवसेना सुद्धा करते. त्यामुळे मुख्यमंत्री नेमके कोणाला उद्देशून बोलले हे कळले तर त्यावर बोलता येईल,’ असे सांगून पटोले यांनी अधिक बोलणे टाळले .