येस न्युज मराठी नेटवर्क । कोरोना रुग्णांची लाखोंच्या संख्येनं होणारी वाढ पाहता भारतातील आरोग्य यंत्रणांपुढं आव्हान उभं राहिलं होतं. यंत्रणा कोलमडते की काय अशीच भीती प्रशासनालाही होती. पण, अखेर कहर माजवणारी कोरोनाची दुसरी लाट आता देशातून काही अंशी ओसरतानाचं चित्र दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन यासंबंधीची माहिती समोर येत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशात 80834 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, 1,32,062 रुग्णांनी या संसर्गावर मात केली. दिवसभरात 3,303 कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढावला. रग्णंख्येचे हे आकडे पाहता मागील 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांचं प्रमाण दुपटीहून जास्त आहे हेच स्पष्ट होत आहे.