येस न्युज मराठी नेटवर्क : सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे अनेक कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने साखर कारखान्यामध्ये प्रथमच ऑक्सिजनची निर्मिती करणार असल्याने धाराशिव साखर कारखान्यावर उस्मानाबादचे पालकमंत्री शंकररावजी गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अंतिम टप्प्यात असलेल्या कामाची पाहणी केली.
याभेटी दरम्यान ऑक्सिजन प्रकल्पासंदर्भात गडाखसाहेब यांनी संपूर्ण माहीती घेऊन चाचणी कार्यान्वित करण्यास सांगितले. वाढत्या ऑक्सिजनच्या मागणीनुसार सगळ्याचे लक्ष धाराशिव साखर कारखान्याच्या पायलट प्रकल्पाकडं लागले असून लवकरच चाचणी यशस्वी करण्याचे कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगितले.
यावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवळे , निवासी उप जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी कळंब डॉ.श्रीमती.अहिल्या गाठाळ मॅडम, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, तहसिलदार रोहन शिंदे, मंडळ अधिकारी .देवानंद कांबळे, कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, दिपक आदमिले आदी उपस्थित होते.
